मराठ्यांचा शनिवारपासून पंढरपूर ते मंत्रालय आक्रोश मोर्चा

  • 3 years ago
मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा सकल समाजाच्या वतीने सरकार विरोधात पंढरपूर ते मंत्रालय(मुंबई) असा चारशे किलोमीटरचा पायी दिंडी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. येत्या शनिवारी (ता. ७) दुपारी पंढरपूर येथील श्री विठ्ठलाचे दर्शन घेवून मोर्चा मुंबईकडे मार्गस्थ होणार आहे. आक्रोश मोर्चात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून सुमारे एक लाख मराठा बांधव सहभागी होणार आहेत,अशी माहिती सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक धनंजय साखळकर यांनी आज पंढरपुरात पत्रकार परिषदेत दिली.