जाहिरात बाजीवर कुणीही गतिमान होत नसतं हे सरकार 2024 ला पूर्णपणे कोसळेल, असा इशारा कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर या ठिकाणी दिलेला आहे. सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नाहीत, भाषण मात्र मोठ-मोठी करतात व सुंदर करतात, असे देखील थोरात यांनी सांगितलं. पुण्याच्या पोटनिवडणुकीतून जनमत हे भाजप व शिंदे सरकारच्या विरोधात गेले असल्याचे देखील बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. ते संगमनेरमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होते.