Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 11/17/2022
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेचे पडसाद आता राज्यभर उमटत आहेत. सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजपा-शिंदे गट आणि ठाकरे गटात टीका टीप्पणी सुरू असताना यावरून आता मनसेही आक्रमक झाल्याचे बघायला मिळते आहे. अशाच भारत जोडो यात्रा उद्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे पोहोचणार आहे. याठिकाणी राहुल गांधी यांची जाहीर सभाही आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे राहुल गांधींना प्रत्युत्तर देण्यासाठी आता राज्यभरातील मनसैनिकांना शेगाव पोहोचण्याची निर्देश राज ठाकरे यांनी दिले असल्याची माहिती पुढे आहे. यासंदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

#AvinashJadhav #Rahulgandhi #RajThackreay #VinayakSavarkar #UddhavThackeray #Shivsena #BharatJodo #Congress #BJP #HWNews

Category

🗞
News

Recommended