सत्ता गेल्यानंतर Aditya Thackeray पहिल्यांदाच विधानसभेत बोलले, उत्तर देताना Fadnavis म्हणाले..| BJP
  • 2 years ago
राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाचा दुसरा दिवस (Maharashtra Monsoon Session) सुरू असून शिवसेनेची सत्ता गेल्यानंतर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे पहिल्यांदाच विधानसभेत बोलले. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाच्या संबंधी निवडणुकींना पाच आठवड्यांची स्थगिती दिली असून राज्य सरकार त्या संबंधी विधेयक पारित करण्यासाठी घाई का करते असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारला. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितलं की निवडणुका घेण्यासाठी कोणतीही स्थगिती नसून ती केवळ 92 नगरपालिकांच्या संबंधित सरकारने दाखल केलेल्या याचिकेसंबंधी आहे.

#DevendraFadnavis #AdityaThackeray #EknathShinde #BJP #MaharashtraAssembly #Shivsena #Maharashtra #MonsoonSession #HWNews
Recommended