शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार काल पार पडला. मात्र, या मंत्रीमंडळ विस्तारावरून आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. “मंत्रीमंडळातील ज्या महान मंत्र्यांनी शपथ घेतली आहे, ते बघता देवेंद्र फडणवीसांनी स्वत:च्याच भविष्यवाणीला तिलांजली दिली आहे”, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.