आषाढी एकादशी झाल्यावर विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार करणार आहे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत भेटू आणि चर्चा करू. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. आमचे सर्व चांगले वाईट निर्णय एकनाथ शिंदे घेतील तसेच एकनाथ शिंदे राज्याला चांगले मंत्रिमंडळ देतील अशी प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे.