देवेंद्र फडणवीसांनी संभाजीनगर आणि जालना मध्ये पाण्याच्या प्रश्नावरून मोर्चा काढला. मी सध्या सोलापुरात आहे. सोलापुरात भाजपचे दोन खासदार आहेत, आमदार आहेत, मंत्री देखील राहिले आहेत, तरी देखील सोलापुरात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. सोलापुरात नऊ दिवसाला एकदा पाणीपुरवठा होतो, त्यामूळे फडणवीसांनी सोलापुरात देखील मोर्चा काढायला हवा.