राज्यात राज्यसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या विजयानंतर जोरदार सत्ताकारण सुरू आहे. त्यातच आता भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची नुकतीच एका कार्यक्रमात मुलाखत झाली. या मुलाखतीत त्यांनी विधानपरिषद निवडणूक आणि राज्यसभा निवडणुकीत भाजपने खेचून आणलेल्या सहाव्या जागेवरून सुरू असलेल्या वाद-विवादाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलंय. राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजितदादांनी पुन्हा आमच्यासोबत यावं असं वक्तव्य केलं आहे.