राज्यात राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. मात्र या निवडणुकीत मतदान करण्यासाठी जामीन देण्याची मागणी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायालयाने नवाब मलिक यांना तातडीने दिलासा देण्यास नकार दिला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या पदरी निराशा पडली आहे.