आषाढीसाठी श्रींची पालखी पंढरपूरकडे सोमवारी सकाळी मार्गस्थ झाली आहे. श्रींच्या पालखीबरोबर ७०० वारकरी पायीवारी करत आहेत. यंदा पालखीचे ५३ वे वर्ष आहे. विशेष म्हणजे दोन वर्षाच्या खंडानंतर पुन्हा माऊलींचा पालखी सोहळा आज वैभवी थाटात मार्गस्थ झाला असून भाविकांमध्ये उत्साह दिसून आला.