'तांडव'च्या निर्मात्यांवर कारवाई करा..अन्यथा मंत्रालयासमोर आंदोलन : राम कदम

  • 3 years ago
मुंबई : तांडव वेबसिरीजच्या निर्मात्यांवर कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिस तयार आहेत. पण महाराष्ट्र सरकार त्यांना रोखत असल्याचा आरोप राम कदम यांनी केला आहे. त्यासाठी राम कदम यांनी घाटकोपरच्या चिराग नगर पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. राज्य सरकारने तांडव वेबसिरीजच्या निर्मात्यांवर कारवाई केली नाही, तर आम्ही मंत्रालयासमोर आंदोलन करू, असा इशारा राम कदम यांनी दिला आहे.