आम्ही 'मविआ' सरकारला पाडण्याच्या भानगडीत पडणार नाही | चंद्रकांत पाटील
  • 2 years ago
एक पक्ष चालवणे कठीण असते. दुसरीकडे तीन पक्ष चालवणे हे तर महाअवघड काम आहे. असं सांगताना चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरचे उदाहरण दिले. कोल्हापूरमध्ये काँग्रेस आमदाराच्या निधनाने रिक्त झालेल्या उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने त्या जागेवर दावा केला. त्या ठिकाणी शिवसेनेनेही दावा केला. पण ही जागा काँग्रेसची असल्याने ती काँग्रेसलाच सोडावी लागली. त्या ठिकाणी या दोन्ही पक्षांमध्ये मतभेद झाले. निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सरकारला अशा अडचणी येणारच आहेत. त्यामुळे आम्ही हे सरकारला पाडण्याच्या भानगडीत पडणार नाहीत. त्यांच्याकडे एकनाथ खडसे यांच्यासारखे नेते सरकारला त्रास द्यायला सक्षम आहेत, असा टोलाही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
Recommended