शेतकरी आंदोलनावरून खा.अमोल कोल्हेंचा लोकसभेत सरकारवर हल्लाबोल

  • 3 years ago
जेव्हा राजाचा अहंकार हा प्रजेच्या हितापेक्षा मोठा होतो, तेव्हा समजून जा, की त्याच्या शासनकाळाचा अंत होणार हे निश्चित आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी शेतकरी आंदोलनवरुन नाव न घेता मोदींना लोकसभेत सोमवारी रात्री लगावला. राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात आर्य चाणक्यची वचनं उद्ध्रुत केली होती.त्याचा प्रतिवाद डॉ कोल्हेंनी चाणक्यचे वरील वचन सांगून सणसणीत टोला लगावला. शेतकरी आंदोलनावर शांततेच्या मार्गाने तोडगा निघाला, तरच आपण जय जवान,जय किसान म्हणू शकू,असे ते म्हणाले.

Recommended