भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचा मंदीराची कुलूपे तोडण्याचा इशारा

  • 3 years ago
मंदिरे उघडण्याच्या मागणी करीता भाजप आक्रमक भूमीकेत आहे. दोन मोठी आंदोलने करुन सुद्धा सरकारने कोणताही निर्णय न घेतल्याने आध्यात्मिक समन्वय आघाडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन वेळा पत्रे पाठवून साधु-संतांच्या शिष्टमंडळाला भेटीची वेळ मागितली होती आणि दि. २७ ऑक्टोबर पर्यंत मंदिरे उघडण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटीची वेळही दिली नाही तसेच मंदिरे उघडण्याचा निर्णय देखील घेतला नाही. यामुळे भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी चे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वात विविध पंथ व संप्रदायांच्या प्रमुख साधु-संतांचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले, यानंतर त्यांनी १ नोव्हेंबर पर्यंत सरकारने मंदिर उघडली नाही तर मंदिराची कुलूपे तोडू असा इशारा दिला

Recommended