#आज_भारत_बंद_है: शेतकरी कायद्याविरोधात वर्ध्यात मोर्चा | Farmer Protest | Bharat Band | Sakal

  • 3 years ago
वर्धा : केंद्र सरकारकडून पारित करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी राजधानी दिल्ली येथे ठिय्या दिला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी मंगळवारी देशव्यापी बंदचे आवाहन करण्यात आले होते. कृषी विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करीत रद्द करण्याच्या मागनीसाठी भारत बंद पुकारण्यात आला आहे. यात वर्धेत विविध संघटनांनी एकत्र येत मोर्चा काढला. शिवाजी चौक परिसरातून मोर्चाला प्रारंभ झाला. या मोर्चात किसान अधिकार अभियान, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, प्राथमिक शिक्षक समिती, आयटक, सीटू यासह अनेक सामाजिक संघटनांचा समावेश होता. (व्हिडिओ - रूपेश खैरी)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended