तोतलाडोहसह पेंच धरणाचे दरवाजे उघडले; सतर्कतेचा इशारा | Latest Marathi News I आजच्या ठळक बातम्या |

  • 3 years ago
टेकाडी (नागपूर) : शुक्रवारला संतत पावसामुळे तालुक्यातील तोतलाडोह धरणाचे 14 दरवाजे तर पेंच धरणाचे 16 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदी काठावरील रहिवाश्यांना सतर्क राहण्याचा इशाराही प्रशासनातर्फे देण्यात आलेला होता. सतत सुरू असलेल्या पावसामुळे सकाळी पारशिवणी, रामटेक आणि कामठी तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलेला पारशिवणी तालुक्यातील कन्हान पिपरी येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने स्थलांतरणाची वेळ आलेली आहे. तर कामठी तालुक्यातील बिना भानेगाव खुल्या कोळसा खाणीमध्ये पुराचे पाणी भरले आहे, खाणीमध्ये पाणी भरण्याची ही पहिलीच वेळ असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रशासनाने नदी काठी राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देत स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. दरम्यान, चौराई धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आलेला आहे. सुटलेल्या पाण्याचा विसर्ग सुरू असून सहा मीटरने पेंच धरणाच्या सोळा दारातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.
(व्हिडिओ - सतीश घारड)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended