सरकारची संवेदनशीलता संपली: चंद्रकांत पाटील| Sakal Media |
  • 3 years ago
सरकारची संवेदनशीलता संपली: चंद्रकांत पाटील
कामशेत : महाविकास आघाडीच्या सरकारची संवेदनशीलता संपली आहे, या सरकारमध्ये शेतकरीपुत्र असलेल्या मंत्रीमहोदयांना जनतेच्या भावना समजतच नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकरी नसले तरी उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकरी आहेत, त्यांनी तरी शेतकऱ्यांना भावना समजून शेतकरी हिताच्या निर्णयाला प्राधान्य दिले पाहिजे, तेही तसे करताना दिसत नाही. सध्या कोरोनामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था विस्कटलेली आहे. दूधधंदा हाच शेतकऱ्यांचा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे सरकारने दुधाला प्रति १० रूपये भुकटीला ५० रुपये अनुदान दिले पाहिजे असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.
#Sakal #SakalVideo #Milk #MilkPrice #Farmer #Chandrakantpatil #Agitation

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended