काहीही झालं तरी शेतकरी कायदा रद्द होणार नाही : चंद्रकांत पाटील | Pune | Maharashtra | Sakal Media |

  • 3 years ago
पुणे : ''काहीही झालं तरी कायदा रद्द होणार नाही, त्यात फक्त बदल केला जाईल, सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन कायदा तयार केला आहे.'' अशा परखड शब्दात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून राज्यात आंदोलन करणाऱ्यांना खडेबोल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुनावले. डॉ.बाबासाहेब आंबेडकारांना अभिवादन करण्यासाठी ते पुण्यात आले होते. दरम्यान, यावेळी पुणे स्टेशनजवळच्या आंबेडकर पुतळ्याजवळ अनुयायांची गर्दी झाली होती. दरम्यान दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला फटकारले होते. केंद्र सरकारने दखल घ्यायला हवी होती पण घेतलेली दिसत नाही असे वक्तव्य केले होते. शरद पवारांच्या वक्तव्याला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी, शेतकरी कायदा रद्द होणार नसल्याचं ठणकावून सांगितले. ''केंद्र सरकारने केलेल्या कायद्यात नवीन काही बदल केला नाही. जे जुन्या कायद्यात होतं तेचं आहे, फक्त आता या कायद्याने शेतकऱ्यांना मार्केटच्या बाहेर माल विकण्याची परवानगी मिळाली, जी आधी नव्हती. प्रश्न फक्त एमएसपीचा होता, केंद्र सरकार ऑन पेपर एमएसपीची रक्कम लिहून द्यायला तयार आहे. तरीही आम्ही आंदोलन करणार, भारत बंद करणार याला काही अर्थ नाही, केंद्र सरकारने केलेला कायदा रद्द होणार नाही ,फक्त कायद्यात बदल केला जाईल.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended