विधान परिषद निवडणुकीच्या राजकारणावर Balasaheb Thorat यांची प्रतिक्रिया
  • last year
नाशिक पदवीधर निवडणुकीत झालेल्या गोंधळामुळे काँग्रेसमधील अंतर्गत खदखद पुन्हा समोर आली आहे. नवनिर्वाचित आमदार सत्यजीत तांबे यांनी नुकतीच याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. यावर आता बाळासाहेब थोरात काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. अखेर बाळासाहेब थोरात यांनी या सर्व प्रकरणावर भाष्य करत जे राजकारण झालं ते आपल्याला व्यथित करणारं होतं. याबद्दल पक्षश्रेष्ठींना आपल्या भावना कळवल्या, असं ते म्हणाले. यासह त्यांनी सत्यजीत तांबे यांचं अभिनंदन देखील केलं आहे.
Recommended