शेतकरी प्रश्नावर सन्मान जनक तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने पुढे यावे - डॉ. अमोल कोल्हे | Sakal
  • 3 years ago
कोरेगाव भीमा, ता. ९ : शेतकरी प्रश्नावर सन्मानजनक तोडगा काढण्यासाठी केंद्रसरकारने पुढे यावे, असे आवाहन करतानाच देशाच्या आरोग्यव्यवस्थेची स्थिती पाहता अगोदर रुग्णालये आणि मग संसद भवन यावर आत्मचिंतन करावे. असे आवाहन संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणात नमूद मुद्यांवर मत मांडताना, कोल्हे बोलत होते, यावेळी ते म्हणाले, ‘राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात केंद्र सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख केला. मात्र या योजनांचा लाभ जर तळागाळातील लोकांना झाला असेल तर मी या सरकारचे अभिनंदन करतो. राष्ट्रपती महोदयांनी आपल्या अभिभाषणात नव्या संसद भवनाचे निर्माण करण्याबाबत उल्लेख केला.
परंतु ज्या देशाची सार्वजनिक आरोग्यव्यवस्था कमकुवत असल्याचे कोरोनासारख्या महामारीने पुर्णतः उघड झाले असेल त्या देशाचे प्राधान्य काय असायला हवे ? सध्या गरज लोकसभा मतदारसंघ, जिल्ह्यात सुसज्ज असे सार्वजनिक रुग्णालय उभारण्याची गरज आहे.
या सरकारला विनंती आहे की,देशाच्या आरोग्यव्यवस्थेची स्थिती पाहता अगोदर रुग्णालये आणि मग संसद भवन यावर आत्मचिंतन करावे. असंही या संसद भवनाची मागणी कुणीही केलेली नाही परंतु ज्या निधीची मागणी सर्वजण करीत आहेत तो खासदार निधी तातडीने पुर्ववत केला जावा अशी माझी या सरकारला मागणी आहे.
Video Credit: @Lok Sabha TV
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended