'...त्यांना आता मुंबईतील जनताच उत्तर देईल'; Devendra Fadnavis यांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर
  • last year
मुंबई महापालिकेकडून ४०० किलोमीटरच्या रस्त्यांमध्ये ६ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केली होता. ४०० किलोमीटर रस्त्यांचा प्रस्ताव कोणी मांडला? आणि ६००० कोटी रुपयांचं काम प्रशासकाने मंजूर करणे कितपत योग्य आहे? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले होते. दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या आरोपाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त देवेंद्र फडणवीस यांनी आज बिकेसी येथील मैदानाचा पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Recommended