जर अधिकाऱ्यांनी मार खाल्ला तर आमची जबाबदारी नाही | मनसे
  • 2 years ago
पूर्व मुंबई उपनगरातील मुंबई महानगरपालिकेचा मलनिस्सारण प्रकल्प दोन वर्षापासून बंद आहे. सांडपाणी हे विनाप्रक्रिया समुद्रात सोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे मुंबई उपनगराचे पालकमंत्री असून त्यांच्याच विभागात हा प्रकार सुरू असल्याचा मनसेचा आरोप आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या प्रकल्पाला भेट दिली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी स्विझर्लंड, स्कॉटलांडमध्ये फिरायचं आणि अवॉर्ड घ्यायचे पण स्वतःच्या विभागाकडे दुर्लक्ष करायचं. पार्ट्या करण्यापेक्षा त्यांनी याठिकाणी डोळे उघडे ठेवून बघावं म्हणजे परिस्थिती लक्षात येईल. असे आरोप करत संदीप देशपांडे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना टोला लगावला.
Recommended