Jalgaon : 'कुणी जपानी, तर कुणी चायनिज म्हणून हिणवतं.. पण भारताने भरपूर दिलंय'

  • 2 years ago
#TibetanPeople #StateGovernment #MaharashtraTimes
भारत आणि चीनच्या मधोमध असलेल्या तिबेटवर १९५९ मध्ये चीने कब्जा मिळविला. तेव्हापासून तिबेटीयन लोक भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये विखुरलेले आहे. अशाप्रकारे कनार्टक, बंगळुरुसह विविध राज्यांमध्ये तिबेटीयन लोकांचा एक गट गेल्या ४० वर्षांपासून जळगावात स्वेटर विक्रीसाठी येत असतो. रेफ्युजी म्हणून या लोकांची ओळख असली, तर यांना कुणी चीनी, कुणी जपानी, तर नेपाली म्हणून हिणविल जात. भारतात या लोकांना शासनाकडून जमीन, घर मिळाले. उदरनिर्वाहाचे साधन मिळाले. मात्र तरीही हे लोक समाधान नाहीत. भारताने राहायला जागा, उदरनिर्वाहासाठी जमीन दिली त्याबद्दल शासनाचे आभार. पण भारताने अजून एक उपकार आमच्यावर करावेत. चीनने हिरावलेले स्वातंत्र्य परत मिळवून तिबेट द्यावे. तिबेटीयन लोकांचा चीनने त्यांच तिबेट हिरावल्यापासून तर भारतात स्थलांतरीत होण्यापर्यंत संघर्ष...ते पूर्णतः का समाधानी नाहीत, त्यांना का त्यांच हिरावलेले तिबेट परत पाहिजेल...अशा सर्व प्रश्‍नांवर तिबेटीयन लोकांच्या भावना जाणून घेतल्या आहेत.

Recommended