Kisan Jan Aakrosh Morcha | ‘मंत्र्यांचे खिसे गरम झाले असतील तर जनतेकडे लक्ष द्या’ | SakalMedia
  • 2 years ago
Kisan Jan Aakrosh Morcha | ‘मंत्र्यांचे खिसे गरम झाले असतील तर जनतेकडे लक्ष द्या’ | SakalMedia
तिवसा (जि. अमरावती) : माजी कृषिमंत्री व भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात तिवसा तहसील कार्यालयावर भाजपच्या वतीने किसान जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. दिवाळीआधी शेतकऱ्यांना आर्थिक मदतसह विविध मागण्यांना घेऊन शहराच्या राष्ट्रीय महामार्गावरून मोर्चा काढण्यात आला. माध्यमांशी बोलताना अनिल बोंडे यांनी पालकमंत्र्यांचे खिशे गरम झाले असतील तर आपल्या मतदार संघातील जनतेकडे लक्ष द्यावे अशी टीका केली. पालकमंत्री शेतकरी व सर्वसामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप देखील बोडे यांनी केला. (व्हिडिओ - प्रतीक मकेश्वर)
#Amravati #BJP #Anilbonde #Farmer #KisanJanAakroshMorcha
Recommended