औरंगाबादकरांसाठी खुष खबर .. जायकवाडी धरण ६० टक्के भरले. | Aurangabad

  • 3 years ago
औरंगाबाद : जायकवाडी धरणात आज अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून विसर्ग सुरू असल्याने ३१०३८ क्युसेक्स आवक सुरू होती. सायंकाळी ७ वा धरणाचा जलसाठा ६७.१६ टक्के झाला होता. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता फक्त ६.३३ फूट पाण्याची गरज आहे. धरणात आवक कमी झाल्याने धरणाच्या पाणीपातळीत आज गेल्या दोन दिवसाच्या मानाने संथगतीने वाढ झाली.

नाशिक जिल्ह्यातील नांदूरमधमेश्वर वेअर मधून गोदावरी पात्रात आज २९५९४ क्युसेक व अहमदनगर जिल्ह्यातील ओझर वेअर मधून ९७६९ क्युसेक विसर्ग सुरू होता. हे पाणी जायकवाडी धरणात ३१०३८ क्युसेक क्षमतेने दाखल होत होते.
१५२२ फूट जलक्षमता असलेल्या जायकवाडी धरणाची पाणीपातळी सायंकाळी ७ वा १५१५.४७ फूट झाली होती. धरणात एकूण जलसाठा २१९६.२५९दलघमी( ७७.५५ टीएमसी) झाला होता. यापैकी जीवंत जलसाठा १५४८.१५० दलघमी ( ५१.४८ टीएमसी) इतका झाला आहे.


आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #Aurangabad
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Recommended