Lokmat News | शेतकऱ्याच्या मृत्यूला मुख्यमंत्री जबाबदार | सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल | Lokmat

  • 3 years ago
गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील पिंडकेपार येथील शेतकऱ्याने कर्जामुळे आत्महत्या केली होती. या आत्महत्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरून भाजपचे माजी खासदार नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे.पिंडकेपार येथील माधोराव आत्माराम गजभिये यांनी कर्जाची परतफेड न करू शकल्याने नैराश्येतून किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. मात्र गोंदिया जिल्ह्यात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नसल्याचं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर नाना पटोले यांनी गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षात केलेल्या आत्महत्यांची आकडेवारी सादर केली. तसेच शेतकरी आत्महत्या सुरू असताना असं वक्तव्य करून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचंही आरोप पटोले यांनी म्हटलं आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended