पाकिस्तानात अडकलेले भारतीय परतले मायदेशी | India | Pakistan |Lahore |Attari Wagah border|Sakal Media
  • 3 years ago
अमृतसर : जे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या बंधनामुळे पाकिस्तानात अडकलेले 360 भारतीय आणि 50 नोरी (भारतात परत येण्याचे बंधन नाही) व्हिसा धारक मायदेशी परतले. 28 जूनला अट्टारी-वाघा बॉर्डरद्वारे ते भारतात परतले. लोक सामान घेऊन जाताना, गाड्यांमध्ये सामान ठेवताना दिसले. भारतात परत आलेल्यांपैकी एकाने मायदेशी परत आल्याचा आनंदही व्यक्त केला. पाकिस्तानाच्या 3 मच्छीमारांना 28 जूनला मानवतेच्या नात्याने भारताने मुक्त केले. 2016 साली भारताच्या गुजरात किनारपट्यावर त्यांना पकडले होते. लाहौर येथील रहिवाशालाही त्याच दिवशी अट्टारी-वाघा बॉर्डरद्वारे मुक्त केले. 2017 साली पंजाबमध्ये तारण तरण येथे त्याला पकडले होते. एएनआयशी बोलताना, लाहोर येथील रहिवासी मोहम्मद रमझान म्हणाले की, मी 2017 मध्ये 15 ऑगस्टच्या परेडसाठी आलो तेव्हा त्याने अनवधानाने सीमा ओलांडली. “मी लाहोरमध्ये टेलर होतो आणि 2017 मध्ये मी १५ऑगस्टच्या परेडसाठी आलो तेव्हा अनवधानाने सीमा ओलांडली. मी ४ वर्षानंतर घरी जात आहे. आज मला सोडण्यासाठी मी भारत सरकारचे आभार मानतो, ”रमझान म्हणाले.
#Indians #Pakistan #coronavirus #Amritsar #Lahore #AttariWagahborder
Recommended