राष्ट्रसंतांच्या समाधी स्थळावरून बच्चू कडू यांचा शेतकऱ्यांसाठी एल्गार | Amaravati | Sakal Media |

  • 3 years ago
तिवसा (जि. अमरावती) : रंगा बिल्लाच्या जोडीने केवळ अदानी, अंबानी या वर्गाचे भले केले आहे. केंद्र सरकारला शेतकऱ्यांशी काही घेणेदेणे नाही. जबरदस्तीने शेतकऱ्यांवर काळा कृषी कायदा लादून मानहानी कारभार सुरू आहे. त्यामुळे सरकारने आणलेल्या या कृषी कायद्याविरोधात सर्वांनी एकजुटीने दिल्लीत होत असलेल्या आंदोलनाला समर्थन देणे आवश्यक आहे, असे मत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राष्ट्रसंताच्या समाधी स्थळावरून व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधी स्थळावरून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दुचाकी मोर्चा काढून दिल्ली येथे तळ ठोकून असलेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनात एल्गार पुकारला आहे. बच्चू कडू हजारो कार्यकर्त्यांसह दिल्लीसाठी रवाना झाले आहे. (व्हिडिओ - प्रशिक मकेश्वर)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended