बच्चू कडू यांचे जनतेला आवाहन, म्हणाले काळजी घ्या
  • 3 years ago
अकोला ः कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता विदर्भ चेंबर ऑफ कामर्स व इतर सर्व व्यापारी संघटनांनी एकत्र येत शुक्रवार, ता. २५ सप्टेंबरपासून पाच दिवस जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. जिल्हा प्रशासनानेही त्याला पाठिंबा दर्शविला आहे. पालकमंत्री बच्चू कडू यांनीही व्यापाऱ्यांच्या आवाहनाला जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मात्र फुटपाथ व किरकोळ विक्रेत्यांसह विविध संघटनांचा या जनता कर्फ्यूला विरोध असल्याने सुरू होण्यापूर्वीच त्याचा फज्जा उडताना दिसत आहे. त्यामुळे जनताही जनता कर्फ्यूबाबत संभ्रमात पडली आहे.दरम्यान अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी जनता कर्फ्यूला सर्वांच्या पाठिंवाच्या आवश्यकता आहे. काया फायदा होणार यापेक्षा काही वाईट होणार नाही. झाला तर फायदाच होईल. सर्वांनी जबाबदारी घेतल्याशिवाय कोरोनाचे संकट जाणार आहे. काळजी घेणे आवश्यक आहे. संक्रमित होणार नाही याची दक्षात घ्या. प्रतिकार वाढवा. जनतेने व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन आवाहन केलेल्या जनता कर्फ्यूला साथ द्यावी व स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

Latest Marathi News I Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |


Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended